सजग मतदारच सजग लोकशाही निर्माण करू शकतो! 🗳️
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका : जनतेने सजग व्हावे, उमेदवारांचे चारित्र्य तपासावे! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आता दारात येऊन ठेपल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच प्रत्येक उमेदवार आपला लोकसंपर्क वाढवू लागला आहे. कोणी धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रायोजक होत आहेत, कोणी समाजसेवेच्या नावाखाली लोकांवर पैसे खर्च करीत आहेत, तर काही नव्या क्लुप्त्या लढवून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. "आपण समाजोपयोगी आहोत" असे दाखविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. परंतु या गोंधळात मतदारांनी अत्यंत सजग राहणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोणती संकटे आली आणि त्या वेळी हेच उमेदवार कुठे होते, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. फक्त आश्वासने देणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, तर त्यांच्या कृतीचा मागोवा घ्यावा. जनतेने विचारावे असे काही मूलभूत प्रश्न : उमेदवाराचा मागील कार्यकाळातील अहवाल काय आहे? त्याने गावात किंवा विभागात कोणती ठोस कामे केली? शासकीय निधी किती मिळाला आणि तो नेमका कुठे खर्...